हे पुस्तक जगातील सर्वांत कठीण स्पर्धा परीक्षेवर मात करून आयएएस अधिकारी बनलेल्या व्यक्तींच्या प्रेरणादायी कहाण्या सादर करते. अनेक अडथळ्यांचा सामना करून, ठाम निर्धाराने हे उद्दिष्ट साध्य करणार्यांच्या या कथा विलक्षण आहेत. सिक्कीममधील एका अंध युवतीपासून केरळात सरकारी कारकून असलेली एक युवा माता, काश्मीरच्या दुर्गम गावातील एका मुलापासून राजस्थानचा एक आयआयटी पदवीधर - या सात अत्यंत दृढनिश्चयी तरुण-तरुणींच्या अद्वितीय कथा या पुस्तकात वाचायला मिळतात. यूपीएससीच्या दुर्गम शिखरावर चढाई करताना त्यांना आलेल्या अडचणी त्यांची वाटचाल थांबवू शकल्या नाहीत, तर त्यांनी त्यावर मात करत यशाचे शिखर गाठले. या विलक्षण व्यक्तींनी ज्या यशस्वी रणनीती वापरल्या आणि यशाचे जे मूलमंत्र त्यांना गवसले, त्यांचा सारांशही या पुस्तकात दिला आहे, जो सिव्हिल सर्व्हिसेस उमेदवारांसाठी एक अमूल्य मार्गदर्शन ठरू शकेल. शीर्षकाच्या पलीकडे जात हे पुस्तक म्हणजे जिद्द, समर्पण आणि स्वप्नांच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. सिव्हिल सर्व्हिसेस असो किंवा कोणत्याही महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाचा पाठपुरावा; या चिकाटी आणि सहनशीलतेच्या कहाण्या वाचकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरणा व बळ देती